कोळसा खाणीनं ग्रामस्थांचं पाणी पळवलं? संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बोरगावात पाण्यासाठी वणवण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगावाजवळ विकासाचे प्रकल्प आले, मोठे उद्योग व्यवसाय आले तर गावाचा विकास होतो. मात्र, नागपूर जिल्ह्यातील बोरगाव मध्ये नेमकं याच्या विपरीत घडलंय. गाव जवळ असलेल्या कोळशाच्या खाणीमुळे गावातील पाणीच पळालंय. त्यामुळे एकेकाळी संत्र्यांच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेले बोरगाव आज खरिपाच्या शेतीलाही महाग ठरतंय. भर पावसाळ्यात हिरव्यागर्द निसर्गातही बोहरगावला कृत्रिम दुष्काळ सोसावा लागत आहे. एबीपी माझाने संबंधित अधिकाऱ्यांशी बोलण्याचे प्रयत्न केले मात्र, गावाची अडचण शासन दरबारी मांडण्यात आली आहे. लवकरच उपाय करू असं सरकारकडून उत्तर मिळालं.