Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गाचा गो तस्करीसाठी वापर केला जातोय का ?

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गाचा गो तस्करीसाठी वापर केला जातोय का ? महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वापर सध्या गो तस्करीसाठी केला जातोय का?? असा सवाल सध्या उपस्थित होतोय... कारण वर्धा जिल्ह्यातून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयास्पद ट्रकचा पोलिसांनी पाठलाग केला असता या ट्रकमध्ये 50 हून अधिक गाई अत्यंत दाटी-वाटीने कोंबल्या होत्या..  त्यातील काही गाईंचा मृत्यू झाला होता तर काही गाई जखमी झाल्या होत्या ...दरम्यान हिंगणामध्ये ट्रकचालकासह दोन जण ट्रक सोडून पसार झाले..  पोलिसांनी अज्ञात गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola