Mumbai | कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांचं सरकारच्या निर्णयावर काय मत?
एसटी महामंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जादा गाड्या सोडल्या जातात. तसेच चाकरमान्यांच्या मुंबईतील मंडळांकडून ग्रुप बुकिंगही मोठ्या प्रमाणात होते. हे बुकिंग 45 दिवस आधी करणे अपेक्षित असते. यंदा रेल्वेने प्रवासाची शक्यता धुसर असल्याने चाकरमान्यांना एसटीच्या जादा बसेसचा आधार होता. एसटी महामंडळाने आता चाकरमान्यांसाठी एसटी बसेस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी चाकरमान्यांसाठी विशेष एसटी बस सोडल्या जातील, असे सांगितले आहे. आता चाकरमान्यांनी सरकारकडे काय मागण्या केल्या आहेत याचा आढावा एबीपी माझाचे प्रतिनिधी वैभव परब यांनी घेतला आहे.
Tags :
Konkan Ganpati Utsav Minister Anil Parab Ganesh Utsav Vaibhav Parab Anil Parab Ganeshotsav Ganpati Konkan