Vasai : वसईच्या समुद्र किनाऱ्यात थरारक बचावकार्य, संशयास्पद बोटीवरील खलाशाला वाचवलं
वसईच्या समुद्र किना-यावर संशयास्पद आढळलेल्या बोटीवरील खलाशाला अखेर १२ तासानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या हॅलिकॉप्टरने रेस्क्यू करून, सुरक्षीत बाहेर काढण्यात यश आलं आहे. रफिक शेख असे रेस्क्यू करून काढलेल्या खलाशाचे नाव आहे . सध्या बोटीच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्याने बोट समुद्रातच आहे. तिला दुसऱ्या बोटीने बाहेर काढण्यात येणार आहे. सध्या खलाशी आणि मालकाला वसई पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.