रेल्वे प्रवाशांना दिलासा, गाडी सुटण्यापूर्वी अर्धा तास आधी तिकीट आरक्षणाचा दुसरा चार्ट लागणार
नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वेने तिकीटांच्या आरक्षणासंबंधी मोठे बदल केले आहेत. या बदलेल्या नियमानुसार आता गाडी सुटण्यापूर्वी अर्धा तास आधी तिकीट आरक्षणाची दुसरी यादी लावण्यात येणार आहे. हा बदल आजरपासुन लागू होणार आहे. या आधीच्या नियमानुसार हा काळ दोन तास इतका होता.
यासंबंधी काढण्यात आलेल्या एका निवेदनात रेल्वेने सांगितले आहे की कोविड-19 च्या पूर्वीच्या नियमांनुसार इंटरनेटच्या आणि पीआरएस काउंटरच्या माध्यमातून प्रथम प्राधान्य तत्वानुसार रिकाम्या बर्थसाठी ऑनलाईन टिकीट बुकिंग करता यावे यासाठी तिकीट आरक्षणाची पहिली यादी ही गाडी स्थानकावरून सुटण्यापूर्वी किमान चार तास आधी तयार केली जात होती.
यासंबंधी काढण्यात आलेल्या एका निवेदनात रेल्वेने सांगितले आहे की कोविड-19 च्या पूर्वीच्या नियमांनुसार इंटरनेटच्या आणि पीआरएस काउंटरच्या माध्यमातून प्रथम प्राधान्य तत्वानुसार रिकाम्या बर्थसाठी ऑनलाईन टिकीट बुकिंग करता यावे यासाठी तिकीट आरक्षणाची पहिली यादी ही गाडी स्थानकावरून सुटण्यापूर्वी किमान चार तास आधी तयार केली जात होती.