वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डोंबिवलीकरांचा 'जलमार्ग', डोंबिवली ते वेहेळे फेरी बोटीचा प्रतिसाद वाढला
निनाद करमरकर, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात मिशन बिगीन अगेन आणि अनलॉक सुरू झालं असलं, तरीही सर्वसामान्य प्रवाशांना मात्र अजूनही लोकल प्रवासाची मुभा मात्र मिळालेली नाहीये. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकर चाकरमान्यांना रस्ते मार्गाने, म्हणजेच शिळफाट्यामार्गे ठाणे मुंबईचा प्रवास करावा लागतोय. मात्र या प्रवासामध्ये वाहतूक कोंडी, खड्डे यामुळे अनेक तास वाया जातात. पण हार मानतील ते डोंबिवलीकर कसले.. त्यामुळेच यावर उपाय म्हणून डोंबिवलीकरांनी आता जलमार्गाचा वापर सुरु केला आहे.