MNS | डोंबिवलीतील २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी पालकमत्र्यांची नियत साफ नाही : राजू पाटील

Continues below advertisement
कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या २७ गावांची वेगळी नगरपालिका करण्यावरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केलाय. २७ गावांची वेगळी पालिका करण्याबाबत एकनाथ शिंदेंची नियत साफ नसल्याचं वक्तव्य आमदार पाटलांनी केलं आहे. आमदार राजू पाटील यांनी नुकतीच केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू पाटील यांनी शिंदेंवर आरोप केला. २७ गावांची वेगळी नगरपालिका करण्याची स्थानिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही राजू पाटील यांनी ही मागणी मांडली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram