Mumbai-Pune : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरुन दररोज दहा हजार वाहने TOLL न देता प्रवास करत असल्याचा दावा
मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरुन दररोज दहा हजार वाहने टोल न देता प्रवास करत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून करण्यात आलाय. ही माहिती संशयास्पद असल्याचा आरोप पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केलाय. वेलणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणी चौकशीची मागणी केलीय.