Param Bir Singh : परमबीर सिंह 234 दिवसांनी मुंबईत, गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजेरी

ज्यांच्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना खुर्ची गमावून जेलची हवा खावी लागतेय, ते परमबीर सिंह अखेर मुंबईत परतलेत. तब्बल 234 दिवसांनी त्यांनी दर्शन दिलंय. मुंबईत दाखल होताच परमबीर यांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजेरी लावलीय. गेल्या 4  तासांपासून परमबीर यांची चौकशी सुरु आहे. खंडणीचा गुन्हा दाखल असलेले आणि न्यायालयानं फरार घोषित केलेले परमबीर सिंह गेले अनेक महिने गायब होते. आपण चंदीगडमध्ये असल्याचं त्यांनी एबीपी माझाला कालच सांगितलं होतं. त्यानंतर आज ते मुंबईत दाखल झाले. तूर्तास सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून दिलासा दिलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola