Palghar | पालघरमध्ये चोरांच्या अफवेतून ग्रामस्थांकडून तिघांचा खून, पोलिसांची गाडीही फोडली

पालघर जिल्ह्यात चोराच्या अफवेतून तिघांची हत्या झाली. रात्री आपल्या इक्को कारने प्रवास करत असलेल्या 3 जणांना गडचिंचले भागातील काही लोकांनी पकडले आणि चोर समजून मारायला सुरुवात केली त्यानंतर कासा पोलीस घटनास्थळी पोचले त्यांनी त्या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या जमावाने पोलिसांची गाडी फोडून त्या तिघांचा ही निर्घृण खून केल्याची घटना घडली. कासा पोलिसांनी आपला जीव कसाबसा वाचवला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola