Mumbai : 'एक वर्ष वाया गेलं, परत लॉकडाऊन नको', मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
03 Apr 2021 04:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवारी) तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला.