Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठा बारा टक्क्यांवर, 25 जूनपर्यंत पुरेल इतकाच साठा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jun 2023 08:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वेगानं खालावू लागलाय. तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधला पाणीसाठा हा १२.७३ टक्के इतकाच शिल्लक आहे. पुढचे केवळ २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. तसंच राखीव साठ्याचा वापर करण्यास राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाहीय. त्यामुळे पाऊस लांबल्यास मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न सध्या महापालिकेसमोर आहे.