Mumbai Rains : कांदिवलीतल्या मुंबई महापालिकेच्या पार्किंगमध्ये पाणीच पाणी; 400 कार पाण्याखाली
शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं आतापर्यंत 30 मुबईकरांचा जीव घेतलाय. या पावसानं जीवितहानीबरोबरच मोठं आर्थिक नुकसान देखील केलंय. मुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमधल्या 400 पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली होत्या.. आणि आता पाणी ओसरल्यानंतर वाहनांची अवस्था पाहून, महापालिकेला नक्की कशासाठी पैसे मोजले होते असा सवाल वाहनमालकांना नक्कीच पडला असणार.