Mumbai Water : मुंबईतील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय लांबणीवर , सात धरणांमध्ये 74 टक्के पाणीसाठा
abp majha web team
Updated at:
31 Jul 2023 07:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधला एकूण पाणीसाठा ७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. असं असलं तरी दहा टक्के पाणी कपात रद्द करण्यासाठी अद्याप मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात आढावा घेऊन पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. प्रशासनाने आणखी आठ- दहा दिवस प्रतीक्षा करून निर्णय घेण्याचे ठरवले आहे. ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यास धरणे भरू शकणार नाहीत. तसेच भातसा आणि ऊर्ध्व वैतरणामध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे पालिका प्रशासनानं सावध भूमिका घेतली आहे.