Mumbaiतील वॉर्ड पुनर्रचनेवरून वाद पेटण्याची चिन्हं; मतदारांची नावं गायब करण्याचा प्रयत्न : अमित साटम
मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवरून वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मतदारांची नावं गायब करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलाय. पालिका अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल आणि आयुक्तांनी सादर केलेला अहवाल यात फरक आहे, असा आरोप त्यांनी केलाय. आयुक्तांवर कारवाईची मागणीही त्यांनी केलीय.