Kirit Somaiya | जितेंद्र आव्हाड खरं बोलले, वादग्रस्त वक्तव्यावर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर भापनेही प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड खरं बोलले, असं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधील सभेत सांगितलं की इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला होता. खरं बोललेत ते आणि मला विश्वास आहे, शरद पवार, शिवसेना आणि काँग्रेस त्यांच्या या मंत्र्याच्या वक्तव्याशी सहमती व्यक्त करणार."