MNS | सुधारित नागरिक कायदा आणि एनआरसी कायद्याबाबत मनसेत संभ्रम | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jan 2020 08:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सुधारित नागरिक कायदा आणि एनआरसी कायद्याबाबत मनसेत संभ्रमाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, मनसेच्या पहिल्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीला समर्थन करताना मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र सीएएला मनसेचं समर्थन नसल्याचं आता स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळं राज ठाकरे यांनी सीएएवरुन घुमजाव केल्याची चर्चा रंगतेय. सीएएला समर्थन नाही, तर पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या मुस्लिमांना हाकला, अशी मनसेची भूमिका असल्याचं बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय.