Maharashtra : नाट्यगृहांसाठीत 50 टक्क्यांची अट का? अभिनेते Sharad Ponkshe यांचा सवाल
येत्या २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहं पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. पण त्यासाठी राज्य सरकारनं पन्नास टक्केच आसनक्षमतेची अट घातली आहे. त्यामुळं नाट्यवर्तुळात साहजिकच नाराजीची भावना आहे. दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल आणि मॉल्समध्ये शंभर टक्के प्रवेश देण्यात येत असताना नाट्यगृहांमध्येच ५० टक्के प्रवेश का ?असा सवाल ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला आहे.