Dilip Walse Patil UNCUT : अमरावती, ED, CBI, परमबीर सिंह...सर्व मुद्द्यांवर गृहमंत्र्यांशी खास चर्चा

मुंबई : अमरावती हिंसाचारामागे जर राजकीय पक्षाचा हात असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. हिंसाचारामागे असणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाची किंवा अकादमीची तपासअंती दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये झालेले दंगे असतील किंवा परमबीर सिंह यांना फरार घोषित या सर्व प्रश्नांची उत्तरे गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola