Mumbai Farmers Protest | शेतकऱ्यांचं 'लाल वादळ' मुंबईत धडकलं! आज राजभवनावर मोर्चा
मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ काल रात्री अखेर मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.
Tags :
Farmer Agitation. Farmers Protest Delhi Farmers Agitation Kisan Sabha Agitation Mumbai Farmers Protest Maharashtra Farmers Protest Kisan Sabha Kisan Kisan Sabha Morcha Shetkari Morcha Mumbai