Mumbai : मुंबई महापालिकेच्या भंगार विक्रीत घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप ABP Majha

Continues below advertisement

मुंबई महापालिकेत भंगार घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता जुन्याच कंत्राटदाराला भंगार विक्रीचं कंत्राट दिल्यामुळे यात मोठं नुकसान झाल्याचा आणि कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. महापालिकेच्या जुन्या लोखंडी जलवाहिन्यांचे तुकडे भंगारात देण्यासाठी पालिकेकडून कंत्राटदार नेमण्यात येतो. सध्या १ लाख १८ हजार किलो वजनाच्या तुकड्यांची भंगारात विक्री करण्यासाठी महापालिकेनं कंत्राटदार नेमला आहे. त्यातून महापालिकेला ३२ कोटी २६ लाख रुपये मिळणार आहेत. त्यात महापालिकेचं नुकसान झाल्याचं भाजपचं म्हणणं आहे. पण  महापालिकेनं १८ रुपये १४ पैसे प्रतिकिलो अंदाजित दर काढला असताना, कंत्राटदारानं ३२ रुपये २१ पैसे इतका दर दिला असं प्रशासनाचं म्हणणं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram