Bharat Bandh | शेतकऱ्यांकडून आज 'भारत बंद'ची हाक; मुंबईतील दादर भाजी मार्केट सुरु

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी भाजी मार्केट वगळता मुंबईतील इतर भाजी मार्केट आणि इतर सेवा सुरळित सुरू आहेत. मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी बेस्ट बसेस, रिक्षा आणि टॅक्सी सेवा सुरू आहे.  मात्र या बंदला शांततेत प्रतिसाद द्यावा आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola