Ambernath : 12 ते 14 वर्षे वयोगटातल्या मुलांचं लसीकरण ठप्प, लशींचा साठा संपला
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पहिल्याच दिवशी 12 ते 14 वर्षे वयोगटातल्या मुलांचं लसीकरण ठप्प होतं. या तिन्ही शहरांमध्ये लशींचा साठाच उपलब्ध झाला नाही. त्यामुळं लसीकरण सुरु होऊ शकलं नाही. परिणामी लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. आज रात्री उशिरा लशींचा साठा उपलब्ध होणार असून, त्यामुळं उद्यापासून लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती आहे.