Aditya Thackeray : सत्तापेचानंतर आदित्य ठाकरे प्रथमच मुंबईबाहेर ABP Majha
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेसमोर संघटना टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. राज्यातल्या या सत्तापेचानंतर आदित्या ठाकरे आता प्रथमच मुंबईबाहेर पडत आहेत. आजपासून आदित्य ठाकरे यांचीच शिवसंवाद यात्रा सुरू होतेय. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डीमधील नागरिकांशी आदित्य ठाकरे प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.