#MarathaReservation मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सरकार कधीच गंभीर नव्हतं, भाजप खासदार उदयनराजे भोसलेंचा सरकारवर आरोप
मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ही माहिती दिली आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत त्यांना कोणताही फटका बसणार नाही.मात्र ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप प्रवेश झालेले नाही त्यांच्यासंदर्भात सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलंय.
Tags :
Maratha Aarakshan Udayanraje Bhosale New Delhi State Government Supreme Court Satara Maratha Reservation