UNCUT | हे ढोंगी सरकार! आदिवासींच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचे आंदोलन सांगून दिशाभूल - देवेंद्र फडणवीस

नागपूर : हे ढोंगी सरकार आहे, मुंबईत आलेल्या आदिवासींच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचे आंदोलन सांगून आदिवासींची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कृषी कायद्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार देऊ पाहत आहेत. मात्र, काही ढोंगी लोक या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आलेला मोर्चा हा आदिवासींचा आहे. ते सोमवारी भंडारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola