Yavatmal : पाण्याच्या बाटलीनं घात केला! ब्रेक न लागल्यानं मोठा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, 2 जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2021 09:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाहन चालवताना केवळ वाहतुकीचे नियम पाळणं पुरेसं नसतं तर गाडीच्या आत चालकाला अडथळा येऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. तसं न झाल्यास जीवावर बेतू शकतं... यवतमाळच्या पुसदमध्ये अशीच एक घटना घडली आहे. आणि या अपघातात ३ जणांना जीव गमवावा लागलाय. मध्यप्रदेशमधून एका चारचाकी गाडीमधून काही जण पुसद इथे लग्नासाठी स्थळ पाहायला येत होते. पुसद जवळच्या खंडाळा घाटात चालकाच्या पायाजवळ पाण्याची बाटली आली. या बाटलीमुळे गाडीचा ब्रेक लागू शकला नाही.. आणि चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. आणि गाडी फरपटत एका मोठ्या झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता. की त्यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत.