Ratnagiri :रिफायनरीबाबत निर्णय घेण्यासाठी सात गावांचं मतदान, प्रकल्पाविरोधात धोपेश्वर ग्रामसभेचा कौल
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात रिफायनरी होणार की नाही या प्रश्नावर गावकऱ्यांनी आपला कौल दिलाय. धोपेश्वरच्या रिफायनरी बाबत आज झालेल्या मतदाना गावकऱ्यांनी रिफायनरीविरोधात आपला कौल दिलेला आहे. आज झालेल्या मतदानात 466 मतं रिफायनरी विरोधात तर 144 मतं रिफायनरीच्या समर्थनात मिळाली 23 ग्रामस्थांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. बारसू, सोलगाव, धोपेश्वर, तिठवली, पन्हळे तर्फे राजापूर, बागकाझी हुसेन, बागअब्दुल कादिर ही सहा महसूली गावं आजच्या मतदानात सभागी झाली होती. एकूण २७०० मतदार होते मात्र त्यापैकी 633 नागरिकांनी आजच्या प्रक्रियेत मतदान केलं.. आणि रिफायनरीविरोधात कौल दिला.