Vijay Wadettiwar On Mumbai Rain :  300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला सरकार जबाबदार

Continues below advertisement

Vidhan Sabha Vijay Wadettiwar On Heavy Rain :   '300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार
  '300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!    मुंबई : मुंबईमध्ये पावसाने (Mumba Rain) थैमान घातले असून रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. मुंबईत 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचले असून रेल्वे सेवाही विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. मुंबईच्या अवस्थेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे.   मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून मुंबईकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. तर आता विरोधकांनीदेखील राज्य सरकारला धारेवर धरल्याचे चित्र आहे. विजय वडेट्टीवार यांनी सरकारला व्यवस्थापन जमत नाही. अपयशी सरकार अशी ओळख सरकारची निर्माण झाल्याची टीका केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram