Uddhav Thackeray on Buldhana Bus Accident : समृद्धीवरचे अपघात टाळण्यासाठी सरकारने काहीच केलं नाही

Continues below advertisement

Uddhav Thackeray on Buldhana Bus Accident : समृद्धीवरचे अपघात टाळण्यासाठी सरकारने काहीच केलं नाही 

Nashik Bus Accident : 'तारीख होती 08 ऑक्टोबर, भल्या पहाटेची वेळ, यवतमाळ-मुंबईला जाणारी खासगी ट्रॅव्हल्सची बस नाशिकच्या मिरची चौफुलीवर आली अन् पहाटेला ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात (Bus Fire Accident) झाला. क्षणार्धात बस पेटली, प्रवाशांचा आक्रोश, काही क्षणांत होत्याच नव्हतं झालं... जवळपास आठ लोकांचा होरपळून दुदैवी मृत्यू झाला. काळीज चिरणारा आकांत आणि वेदनांचा कल्लोळ हे एवढंच चित्र दिसत होतं, बाकी सगळं राख झालं होतं... आणि तो दिवसही होता शनिवारचाच, भल्या पहाटेचा अन् आजचा बस अपघातही शनिवारीच आणि भल्या पहाटेच... 

बुलढाण्यात (Buldhana) समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपताघानंतर नाशिकमध्ये 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. नाशिकमधे छत्रपती संभाजीनगर रोडवर 8 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे पाच-साडेपाचच्या सुमारास बस आणि ट्रकचा अपघात (Nashik Bus Fire Accident) झाला होता. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता. यवतमाळहून मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस निघाली होती तर धुळ्याहून पुण्याच्या दिशेने ट्रक जात होता. या दोन्ही वाहनांचा नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेल जवळच्या चौकात भीषण अपघात झाला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram