Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात उद्या संभाजीनगरमध्ये मोर्चा
Continues below advertisement
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि पूरग्रस्तांना भरीव मदत या मागण्यांसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढणार आहे, ज्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. 'उद्धव ठाकरेंनी आधी आरशामध्ये पाहावं आणि त्यानंतर मोर्चे काढावेत', असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला आहे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही १६ लाख शेतकऱ्यांचे पैसे दिले, तर ठाकरे सरकारने अडीच वर्षांत कवडीही दिली नाही, असा आरोपही फडणवीसांनी केला. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंवर हल्लाबोल करत, विरोधी पक्षाला वाटलं नव्हतं की आमचं सरकार एवढं मोठं पॅकेज देईल, असं म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना, हे संकट मोठं आहे आणि या संकटात आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोत, असंही शिंदे म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement