Adv Rohit Sharma Full Speech : विधीमंडळ पक्ष हा कायमस्वरूपी नसतो, राजकीय पक्ष हाच कायमस्वरूपी असतो

Continues below advertisement

Adv Rohit Sharma Full Speech : विधीमंडळ पक्ष हा कायमस्वरूपी नसतो, राजकीय पक्ष हाच कायमस्वरूपी असतो

मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) दिलेल्या निकालाचे आता ठाकरे गटाकडून जाहीरपणे विश्लेषण केलं आहे. विधीमंडळ पक्ष हा कायमस्वरूपी नसतो, राजकीय पक्ष हाच कायमस्वरूपी असतो, त्यामुळे विधीमंडळातील बहुमताच्या आधारे पक्षाचा निर्णय देणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा यांनी व्यक्त केलं. एखाद्याने जर पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली तर त्याने त्या पक्षाच्या विचारधारेशी आणि निर्णयाशी एकनिष्ठ राहावं अशी अट आहे असंही ते म्हणाले. 

सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा काय म्हणाले? 

1. राजकीय पक्षाची स्थापना ही लोकांमध्ये होते आणि त्याची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यांचं काम हे कार्यकर्ते करतात. त्यामधून निवडून आलेले लोक हे विधीमंडळात जातात. 

2. विधीमंडळात जाणारे लोक हे कायमस्वरूपी नसतात, तर ते केवळ विधीमंडळांच्या कार्यकाळापर्यंत असतात. राहुल नार्वेकर म्हणतात की, विधीमंडळातील बहुमत हे पक्षाचं बहुमत असतं. पण ते कसं असू शकेल. 

3. जर एखाद्या आमदाराने पक्ष सोडला तर त्याने पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलं असं समजलं जातं आणि त्याला अपात्र ठरवलं जातं. असं असताना राहुल नार्वेकरांनी विधीमंडळाच्या बहुमताला महत्व दिलं. ते पक्षांतरबंदी कायद्याच्या विरोधी आहे.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram