Uddhav Thackeray Full PC : राहुल गांधींचे कौतुक, हिंदुत्वावरून भाजपला टोला- उद्धव ठाकरे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरकार पडेल असं सातत्याने बोललं गेलं, पण आता सरकारला 2 वर्षे झाली. सरकार पडलं नाही पण अनेकांचे चेहरे पडले. त्यांच्या लोकसभेला 31 जागा आल्या पण आता विधानसभेत बघू. फेक नरेटिव्हने पुन्हा पुन्हा जिंकता येत नाही. जनमत पायदळी तुडवून तेव्हा सरकार बनलं, त्याला विरोध करून आम्ही सरकार बनवलं आणि राज्यात महायुती सरकार आलं. आम्ही जनतेचा विश्वास प्राप्त केला. विचार विकास आणि विश्वास ही आमची त्रिसूत्री आहे. या काळात 575 निर्णय आम्ही घेतले. या काळात अनेक वेताळ आडवे आले, पण विकासाचा विक्रम आम्ही केला. आम्ही घरात न बसता सरकार जनतेच्या दारात नेलं.
विरोधकांना जबाबदारीचे भान आहे का नाही? विरोधक आता सभागृहात देखील शिव्या देऊ लागले आहेत. वरच्या सभागृहात झालेला प्रकार दुर्दैवी आहे. विरोधक म्हणून काम करायची सवय लावा, तिकडेच काम करायचं आहे. फेक नरेटिव्हसमोर आम्ही कमी पडलो. तुमच्या फेक नरेटिव्हला आम्ही पॉझिटिव्ह कामाने उत्तर देऊ. तुम्ही केलेली दिशाभूल लवकरच उतरेल.