Uddhav Thackeray On Adani : अदानींवर होणाऱ्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे : उद्धव ठाकरे
अदानी यांच्यावर होणाऱ्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे असं वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं. कोणत्याही घोटाळ्याची न्यायालय किंवा संयुक्त संसदीय समितीसमोर चौकशी होणे हे सर्वसामान्यांच्या आकलनाच्या बाहेरचे आहे. त्यांना निष्पक्षपाती चौकशी अपेक्षित असते असंही ठाकरे म्हणाले. लोकसत्ताच्या लोकसंवाद या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंड, ठाकरे गटाची भविष्यातील वाटचाल, विरोधकांची एकजूट, अदाणी प्रकरणासह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रोखठोक मत व्यक्त केलं.
Tags :
Court Statement Allegation Inquiry Joint Parliamentary Committee Adani Rebellion In Shiv Sena Thackeray Group Chief Uddhav Thackeray Appraisal Fair Inquiry Public Dialogue