Vasai : वसईत पोलिसांकडून चोर समजून आदिवासी महिलांना मारहाण

Continues below advertisement

वसईच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आदिवासी महिलांना विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आता पर्यंत कोणतीच कारवाही झाली नाही. त्यामुळे आदिवासी लोकांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व महिला मूळच्या पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात राहणाऱ्या आहेत. महिलांनी या संदर्भात आदिवासी संघटनांना या घटनेची संपूर्ण माहिती दिली असून त्यांनी या प्रकरणी पोलिसांना जाब विचारला असता. पोलिसांनी केवळ समज देण्यासाठी ताब्यात घेतले असून त्यांना कोणतीही मारहाण केली नसल्याचा दावा केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram