Pandharpur: ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया, पंढरपूर शहरावर पाणी टंचाईचं संकट ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Mar 2022 09:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चंद्रभागा बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली आहे.. बंधाऱ्याचे दरवाजे जीर्ण झाल्यामुळे ही पाणी गळती सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बंधाऱ्यातील हजारो लीटर पाणी वाया जात असल्यामुळे ऐन उन्हाळ्य़ात शहरामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची मागणी वाढल्याने काही दिवसांपूर्वीच उजनी धरणातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात आलंय. मात्र, गळतीमुळे हे पाणी वाया जातंय. त्यामुळे या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे...