Pratap Sarnaik : राज्यात अग्निवीर आणि पोलीस भरतीमध्ये सहभागी होणाऱ्यांची व्यवस्था राज्य सरकार करणार
abp majha web team
Updated at:
29 Aug 2022 07:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात अग्निवीर आणि पोलीस भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिलीय. औरंगाबादमध्ये भरतीसाठी आलेल्या तरुणांना रस्त्यावरच वास्तव्य करावं लागलं होतं. या भरतीच्या वेळी धावताना एका तरुणाचा मृत्यू झाला होता. एबीपी माझाने ही ही बातमी दाखवली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी ही व्यथा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली. त्यानंतर पोलीस भरती आणि अग्निवीर भरतीसाठी सहभागी होणाऱ्या उमेदवारांची जबाबदारी शासनानं घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय.