Maharashtra Politics : शिंदे आणि ठाकरे गटाच्या याचिकांवरची पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार

Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा पेच तूर्तास कायम राहणार आहे... कारण शिंदे आणि ठाकरे गटाच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरची पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे.. आज सरन्यायाधीशांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बुधवारपर्यंत  म्हणजे २७ जुलैला प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना दोन्ही बाजूंच्या वकिलांना दिल्या आहेत. तसंच गरज भासल्यास मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्याची गरज सरन्यायाधीशांनी बोलून दाखवली..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola