Farmers Protest : किमान हमीभाव कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; शेतकरी संघटनांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Nov 2021 08:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanyukta Kisan Morcha Farm Laws Withdrawn: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, संसदेतील कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले. पुढील निर्णय घेण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाची आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीत परिस्थितीच्या आधारे पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकरी नेते किमान हमीभाव कायद्यावर ठाम असल्याची माहिती आहे.