Palghar : विद्यार्थ्यांची पायपीट थांबली; गावांमध्ये वाहनं दाखल! विविध भागांमधून मदतीचा हात

एबीपी माझाच्या बातमीनंतर परीक्षेसाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आलाय. पालघर तालुक्यातील पाड्यावर राहणाऱ्या मुलांसाठी बोर्डाच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत अनेक व्यक्तिंनी विद्यार्थ्यांसाठी मोफत गाड्यांची व्यवस्था करुन दिली आहे. आज गणिताचा पेपर असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी गावात दाखल झाली आहेत. त्यामुळे मुलांचा प्रवास सुखकर झालाय. पालघरमधील सामाजिक कार्यकर्ते तुळशी जोशी, पुण्याच्या कॅफे दुर्गा ब्रँडचे मालक कपिल कुलकर्णी आणि उदय सामंत यांच्या पत्नी जया सामंत यांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola