Special Report | श्रेय घेण्यासाठी दिव्य़ांगांचं साहित्य वाटप केलं जात नाही का? | ABP Majha
दिव्य़ांग नागरिकांसाठी सरकारी पातळीवर विविध योजना राबवण्यात येतात..पण कोल्हापूर जिल्ह्यात मात्र याला हरताळ फासण्यात आलाय...
कोल्हापूर जिल्ह्यातल्या 15 हजार दिव्यांग नागरिकांना वाटप होणारे साहित्याचे वर्षभर पडून आहे... आणि त्याला कारण दिले जाते केंद्रीय मंत्र्यांना उदघाटनासाठी वेळ नाही...केवळ श्रेय घ्यायचे म्हणून दिव्यांग नागरिकांचे साहित्य वर्षभर वाटप न करणे हे दिव्यांगांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे