Special Report : Hanuman Chalisa चं महत्व काय आहे ? का म्हटली जाते?
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात हनुमान चालिसावरुन वाद सुरु आहे.. मशिदीवरचे भोंगे उतरवा अन्यथा हनुमान चालिसा लावू या राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राजकारण तापलंय... उद्या हनुमान जयंतीनिमित्त मनसेसह सर्वच पक्षांनी हनुमान जयंतीनिमित्त महाआरतीचं आयोजन केलंय.... त्यामुळे उद्या राज्यातलं राजकारण हनुमान जंयतीवरुन चांगलंच तापणार आहे... हनुमान चालिसा पठणावरुन सुरु झालेला हा वाद कुठपर्यंत जातो आता हे पाहावं लागणार.. मात्र, हनुमान चालिसाचं महत्व काय आहे.. हनुमान चालिसा का म्हटली जाते..या संदर्भात आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरातील पुजारी महंत सुधीर दास यांच्याकडून जाणून घेतलीय.. मात्र त्यापूर्वी आपण हनुमान चालिसा ऐकूयात....