Sindhudurga: आधी पावसाचं संकट, आता हत्तीचं- भात आणि केळी बागायतीचं नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोड़ामार्ग तालुक्यातल्या तिलारी खोऱ्यात हत्तीनं पुन्हा धुमाकूळ घातलाय. हत्तीनं बाबरवाडी इथं शेतकऱ्याच्या भाताची उडवी आणि केळीच्या बागायतीचं नुकसान केलं. एकीकडे पावसानं शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय. त्यातच आता हत्तीनं नासधूस करायला सुरुवात केल्यानं शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवलं आहे. वनविभागानं हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत....