Sanjay Raut on Kangana Ranaut : कंगना रनौतचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या, संजय राऊत यांची मागणी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगनी रनौत तिच्या वेगवेगळ्या विषयांवरील वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकतच कंगनाने ‘1947 मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं’, असं वक्तव्य वृतवाहिनीच्या कार्यक्रमात केलं. कंगनाच्या या स्वातंत्र्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. कंगनाचं ते वक्तव्य म्हणजे देशाचा अपमान असल्याचं राऊतांनी म्हटलंय. तसंच कंगनाला देण्यात आलेले राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्याची मागणीही राऊतांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, 'सलमान खुर्शीद हे सुद्धा पुरुषी वेषातले कंगनाबेनच आहेत. अशा प्रकारची वक्तव्यं करुन हे विद्वान म्हणवणारे लोक राहुल गांधींना आणि काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम करतात. कंगनाच्या वक्तव्याने जसा देशाचा अपमान झाला तसाच या वक्तव्यानेही देशाचा अपमान झाला आहे. पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी खरंतर भाजपनेच करायला हवी.' पुढे राऊत म्हणाले, 'जो पर्यंत कंगनाचे पुरस्कार मागे घेत नाहीत. तोपर्यंत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा अधिकार सरकारला नाही. ही संपूर्ण देशाची मागणी आहे'