Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 22 ऑक्टोबर 2025

Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा निधी वाटपावरून वाद पेटला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने ५४ आमदारांना प्रत्येकी पाच कोटींचा निधी दिल्याचा मुद्दा गाजत असून, खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी यावर टीका केली आहे. ‘आमदारांना दिलेले पाच कोटी ही लाच आहे, राष्ट्रपतींनी याची दखल घ्यावी,’ अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. या आरोपांना भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. दुसरीकडे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी शिवसेना आणि मनसेसोबत आघाडी न करता स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनीही स्वबळाचा सूर आवळला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली असून, आपला मुलगा राजकारणात कधीच येणार नाही, असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola