Voter List मतदार याद्यांमध्ये एक कोटी बोगस मतदार? राऊतांचा गंभीर आरोप

Continues below advertisement
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये एक कोटी बोगस नावे असल्याचा गंभीर आरोप केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या मते, 'एक कोटी मतदार बोगस असल्यामुळे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे'. विधानसभा निवडणुकीनंतर फक्त चार दिवसांत मुंबईत साडेसहा लाख मतदार वाढवल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या कथित घोटाळ्याविरोधात आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे, भाजपचे नवनाथ बन यांनी राऊत यांचे आरोप 'बोगस' असल्याचे म्हटले असून, मतदारांचा अपमान केल्याबद्दल जनतेची माफी मागण्यासाठी मोर्चा काढावा, असे प्रत्युत्तर दिले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola