होळीसाठी निर्बंध, मुंबईतील चाकरमान्यांनी न येण्याचं आवाहन, पालखी नाचवण्यावर बंदी
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी
Updated at:
12 Mar 2021 08:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे शिमगा, यंदाच्या शिमग्यावर देखील कोरोनाचं सावट असून रत्नागिरी जिल्हा प्रशासन त्याकता आता सज्ज झालं आहे. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोणताही प्रादुर्भाव नाहीय. त्यामुळे आता मुंबई, पुणे किंवा ज्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, शिवाय, जिल्हा बाहेरून शिमग्याकरता रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा 72 तासांपूर्वी केलेला कोरोना बंधनकारक असणार आहे. शिवाय, काळात गर्दी होणार नाही याची देखील खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. दरम्यान जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या काळात खालील नियम लागू असणार आहेत.