Maharashtra Politics: 'मुंबई निवडणुकीनंतर भाजप शिंदेना टार्गेट करणार', रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'मुंबईचे इलेक्शन जसं संपेल तसं एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा टार्गेट केलं जाईल, त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्टीकोनातून संपविण्याचा प्रयत्न तिथे केला जाईल', असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला. फडणवीस सत्तेत आल्यापासून राज्यात जमीन घोटाळे वाढले आहेत आणि हे सरकार 'गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन' देणारे आहे, असा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही पदाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे, मग तो कोणाचाही नातेवाईक असो, असेही ते म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गरज असून, निवडणुका संपताच त्यांना बाजूला केले जाईल, असे भाकीत रोहित पवार यांनी केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement