Powai Encounter: मध्यरात्री फक्त ५ नातेवाईकांच्या उपस्थितीत रोहित आर्यवर अंत्यसंस्कार, कुटुंबाची प्रतिक्रिया देण्यास नकार

Continues below advertisement
मुंबईतील पवई (Powai) येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य (Rohit Arya) याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी पहाटे अडीच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत (Vaikunth Crematorium) त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रोहितची पत्नी, मुलगा आणि इतर काही मोजके नातेवाईक उपस्थित होते, मात्र त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. रोहित आर्य याने गुरुवारी एका स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस धरले होते, सरकारी कामाचे पैसे थकल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले होते. सुमारे तीन तासांच्या थरारनाट्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो मारला गेला आणि सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्याच्या मृतदेहाचे मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर, मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला आणि पुण्यात पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी पार पडला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola