Rohit Arya Encounter : पवईतील थरारनाट्य, पोलीस एन्काऊंटरमध्ये रोहित आर्याचा मृत्यू
Continues below advertisement
मुंबईतील पवई (Powai) येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा (Rohit Arya) पोलीस एन्काऊंटरमध्ये (Police Encounter) मृत्यू झाला. या प्रकरणात तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचेही नाव समोर आले आहे. 'सरकारने माझे दोन कोटी रुपये थकवले आहेत', असा आरोप रोहित आर्यने केला होता. तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर असताना 'स्वच्छता मॉनिटर अभियान' (Swachhata Monitor Abhiyan) गुंडाळल्याने आणि ४५ लाख रुपये थकवल्याचा दावा करत आर्यने यापूर्वी उपोषणही केले होते. तो तणावाखाली असल्याने उपचार घेत होता, अशीही माहिती आहे. पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, रोहितने मुलांवर एअर गन (Air Gun) रोखली होती आणि पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला. सर्व १७ मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement